LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास  ?  : पालकांनी व्यक्त केलाय घातपाताचा संशय : केलीय चौकशीची मागणी

धारवाड : खाजगी शाळेच्या वसतीगृहात राहणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गळफासाने त्याचा मृत्यू झाला असून हा घातपाताचाच प्रकार असून त्याची सखोल चौकशी व्हावी, असे त्या मुलाच्या पालकांनी म्हटले आहे.

प्रीतम कंपली असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिरेऊळ्ळिगेरी गावचा रहिवासी होता.
शिक्षणासाठी तो धारवाड येथील खाजगी इंग्रजी शाळेच्या वसतीगृहात राहत होता.

माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपर्यंत तो रोजच्या प्रमाणे वावरत होता. त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशीही संवाद साधला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याने वसतीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  बातमी त्याच्या पालकांना मिळाली.  
घटनेची माहिती मिळताच प्रीतमचे पालक तातडीने धारवाडला पोहोचले. त्यांनी आपल्या मुलाने आत्महत्या केली नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. “संध्याकाळी मोबाईलवर आमच्याशी बोललेला मुलगा अचानक आत्महत्या करेल, यावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणामागे अन्य कोणाचा तरी हात असू शकतो. हा घातपाताचाच प्रकार असून पोलिसांनी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' त्या '  बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला खानापूरच्या मलप्रभेत : आत्महत्या की घातपात ? : शवविच्छेदनानंतर होणार सत्य उघडघरकुल यादीसंदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख 12 जूननिपाणी तालुका छायाचित्रकार संघटना पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड : अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी तर सचिवपदी  विनायक पाटील यांची निवड अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढाव्यात : सतीश जारकीहोळी यांना निवेदनमहामार्गावरील ' त्या ' बोगद्याचे रुंदीकरण करण्याची मागणी : खासदार प्रियांका जारकीहोळी यांना दिले निवेदनबेळगाव महापालिकेविरुद्ध कारवाई करण्याची कन्नड कृती समितीची मागणी ...!बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू : मंत्री सतीश जारकीहोळीबेळगावमध्ये  2 लाखांहून अधिक रोपांची लागवड....... तर पालकाला नाहीतर गाडी मालकाला 25 हजारांचा फटका बसलाच म्हणायचा ...!महिलेचा चाकूने भोसकून खून