हुबळी : कर्नाटक राज्य सरकारने 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी चांगलेच तापले असून त्यांनी सरकारवर तुष्टीकरणाचे धोरण राबवत असल्याचा आरोप करीत शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारने 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याच्या निर्णयावर प्रल्हाद जोशी यांनी तीव्र टीका केली आहे.
आज शनिवारी हुबळीत प्रसार माध्यमांशी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी, “ राज्यातील गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा हा प्रकार आहे., असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार असे ‘तुष्टीकरणाचे’ धोरण राबवत आहे, जे राज्याच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सरकारने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
या निर्णयामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचेही प्रल्हाद जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
#BJPMinister
#PralhadJoshi
#againststategovt
#pressconference
#hublinews