बेळगाव : सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात महाराष्ट्र एकीकरण समितीचे येळ्ळूर येथील ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल यांना आदरांजली वाहण्यात आली.
येळळूर, चांगळेश्वरी मंदिर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा देताना त्यांच्या निधनामुळे सीमाभागातील चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे उपस्थितांनी श्रद्धांजलीपर भाषणात म्हटले.
अर्जुन गोरल हे कडक शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते नेते होते.
त्यांनी नेहमी येळळूर गावाला योग्य दिशा देण्याचे काम केले. समाजासाठी लढणारा एक लढाऊ नेता गमावल्यामुळे गावाची अपरिमीत हानी झाली आहे, अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
शोकसभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते. सभेच्या सुरुवातीला वामनराव पाटील आणि माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी दिवंगत अर्जुन गोरल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले.
शोकसभेत दत्ता उघाडे, सी. एम. गोरल, बबन कानशिडे, किरण अण्णा पाटील, डी. जी. पाटील, आनंद पाटील, पी. ए. पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश तोपिनकट्टी, धाकलू करविनकोप, उदय जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे आणि परशराम मोटराचे आदींनी आपले विचार मांडले.
या शोकसभेला सतीश देसुरकर, सुरज गोरल, दयानंद उघाडे, दामू अण्णा परीट, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, शिवाजी कदम, शिवाजी गोरल, अजित गोरल, प्रकाश मालुचे, रमेश मेणसे, डॉ. विकास मेणसे, अशोक चौगुले, अनिल पाटील, नेताजी गोरल, राकेश परीट, रमेश पाटील, सी. बी. पाटील, अनंत पाटील, दौलत पाटील, बाळू धामणेकर, कृष्णा बिजगरकर, लक्ष्मी मासेकर, सुवर्णा बिजगरकर, रूपा पुन्यान्नावर, अनुसया परीट, जोतिबा उडकेकर, तुकाराम टक्केकर, रामदास धुळजी, परशराम घाडी, मारुती तुळजाई, मधू कुगजी, रणजित गोरत, गणपती हट्टीकर, रामा पाखरे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, रमेश धामनेकर, वसंत पाटील, भरत मासेकर, सी. एस. पाटील, गजानन पाटील, रघुनाथ मुरकुटे, परशराम कंग्राळकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश गोरल, सचिन दळवी (मंडोळी) आणि मोरे (सावगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
