LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

2 ऑक्टोबरला साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी
सामाजिक संस्थेच्यावतीने साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये गांधी जयंतीदिनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ही कार्यशाळा होणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमानंद गुरव राहणार असून कार्यशाळेचे उदघाटन प्रताप सुतार यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी विजया नाईक यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. स्वागताध्यक्ष शंकर चौगले हे असून यावेळी माननीय धनाजी मोरे व के. आर. भाष्कळ यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.


या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (आरसीयू, बेळगाव) व प्रा.सौ. मानसी दिवेकर (कोल्हापूर) आदी मान्यवर 'साहित्य लेखन कसे करावे' , या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.


या साहित्य लेखन कार्यशाळेत साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साहित्यविषयक अभिरुची जोपासावी असे आवाहन वाय पी नाईक, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, कोमल गावडे यांनी केले आहे. नाव नोंदणी करण्यासाठी वाय. पी. नाईक, मोबाईल क्रमांक 9420204105 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम