LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाजपच्या काळातील दरवाढीबद्दल का नाही आंदोलन ? : डी.के. शिवकुमार यांचा भाजपला खोचक सवाल

बेंगळूर : भाजप कार्यकाळात1 पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या. आता टोल दर वाढवले गेले. याबद्दल भाजप मूग गिळून गप्प का ? या दरवाढीबद्दल का झाले नाही आंदोलन ?
असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्य भाजपला केला आहे.


भाजपच्या दरवाढीविरोधातील आंदोलनावर टीका केली. "आम्ही दुधाच्या दरात वाढ केली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही काम करत आहोत. केवळ खांद्यावर हिरवा टॉवेल घेतल्याने शेतकऱ्यांचा कैवारी होत नाही. आम्ही गावांमध्ये गेलो असता, शेतकऱ्यांनी आम्हाला कधीच विरोध केला नाही, हेच आमचे पुण्य आहे, असे दिल्लीला गेलेल्या डी. के. शिवकुमार यांनी तेथील पत्रकारांशी बोलताना म्हटले.


भाजप कार्यकालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या, तेव्हा भाजपने आंदोलन का केले नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


भाजप व जेडीएस यांच्या आंदोलनाबद्दल विचारले असता, "त्यां दोन्ही पक्षाचा मुद्दा मला नको. एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे हे पक्ष आहेत. मग या चर्चेची गरज काय? असे सांगत भाजपच्या आंदोलनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना आपला पक्ष वाचवायचा आहे, त्यांनी राजकारण करावे," असे डी के. शिवकुमार यांनी सांगितले.


गारंटी योजनांमुळे खर्च वाढल्याने सरकार दरवाढ करत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, "इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात दुधाचा दर कमी आहे."


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, "राहुल गांधी हे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, म्हणून ही भेट झाली. मीही भेट घेतली आहे. अनेक नेत्यांना भेटत असतो. काँग्रेस कार्यालय म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचे मंदिर आहे. भेट घेतल्यास त्यात चुकीचे काही नाही," असे त्यांनी सांगितले.


दिल्लीतील नव्या कर्नाटका भवनबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "हे भवन आपल्या राज्याच्या नागरिकांसाठी एक दूत म्हणून कार्य करेल. यात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांना सोयी मिळतील. येथे होणाऱ्या चर्चांमुळे राज्याला फायदा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही सूचना दिल्या आहेत, त्या आम्ही अंमलात आणू. यावर मुख्यमंत्र्यांचीही सहमती आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम