LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' आता कुठे सिद्धरामय्यांचा खेळ सुरू  झालाय '

धारवाड : मिळालेल्या खात्याबद्दल असमाधानी असलेल्या रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा आणि राजीनाम्याच्या तयारीत असलेले नाराज मुनीयप्पा, हे सारे डीकेशींना अडचणीत आणणारे असून यामागे काहीतरी शिजत तर नाही ना ? अशी शंका राजकीय  अभ्यासकांतून व्यक्त होत असतानाच ' आता कुठे सिद्धरामय्यांचा खेळ सुरू  झालाय ' असे वक्तव्य करीत आमदार अरविंद बेल्लद यांनी शंकेला आणखीनच धार दिली आहे. 

रामलिंगा रेड्डी  आणि मुनीयप्पा यांचा बोलवता धनी सिद्धरामय्यांच असल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.

राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांनी उपरोक्त वक्तव्य करतानाच,  मुख्यमंत्रीपदाचा बदल झाल्यानंतर सरकार सुरळीत चालणार नाही, असे आपण आधीच सांगितले होते, असा दावा  केला आहे.
धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना अरविंद बेल्लद म्हणाले, "सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर सरकार स्थिर राहणार नाही, असे मी पूर्वीच म्हटले होते. आता मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धरामय्या स्वतः पुढे न येता इतरांना पुढे करून राजकीय खेळी खेळत आहेत."
ते पुढे म्हणाले, "सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांनी खेळ केला होता. आता डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्याने ते समाधानी नाहीत. त्यामुळे ते पडद्यामागून राजकीय डावपेच रचत आहेत."
राज्याच्या विकासापेक्षा सत्तासंघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत बेल्लद म्हणाले, "यापैकी कोणालाही राज्याच्या प्रश्नांची काळजी नाही. जून महिना सुरू झाला असूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मंत्री आपल्या पसंतीची खाती आणि अधिकारी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत."
मध्यावधी निवडणुकांची शक्यता कमी असल्याचे सांगताना त्यांनी, "हे सरकार टिकेल, पण त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष सुरूच राहील," असे मत व्यक्त केले.
मंत्री प्रियांक खर्गे यांच्याबाबत बोलताना बेल्लद म्हणाले, "प्रियांक खर्गे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात भूमिका घेत आहेत. आता त्यांच्याकडे गृह खाते आहे, जे अत्यंत जबाबदारीचे खाते आहे. त्यांनी ते योग्य पद्धतीने सांभाळावे."
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी चांगले कार्य करत असल्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. केवळ इतरांच्या बोलण्यावरून किंवा पूर्वग्रहातून संघाकडे पाहू नये," असेही त्यांनी म्हटले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शहापूर पोलिसांनी केले 15 लाख 73 हजार 370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम वजनाचे सोने जप्त समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय? : डॉ.शेवडे यांचा सवालजनआक्रोशाला घाबरून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल' मला दुःख झाले नाही आणि विशेष आनंदही झालेला नाही : खातेवाटपाबद्दल सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया‘लोटस बसदी ’च्या धर्तीवर नवीन टर्मिनलमंत्रिमंडळात एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी यांच्यावर अन्याय :  बेळगाव रेड्डी संघाचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशाराबालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा : विविध प्रकारच्या रोपांची करण्यात आली लागवडडॉ. संतोष जयगौडर म्हणाले, ' पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज ' ...!! आरपीडी कॉलेजमध्ये साजरा झाला जागतिक पर्यावरण दिनराहुल गांधींनी घेतली कठोर भूमिका: म्हणाले, ' रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढा. नाही मानलं तर राजीनामा स्वीकारा पत्नीवर घातला कुऱ्हाडीने घाव :  न्यायालयाने पतीला ठोठावली 5 वर्षांची शिक्षा