LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' आता कुठे सिद्धरामय्यांचा खेळ सुरू  झालाय '

धारवाड : मिळालेल्या खात्याबद्दल असमाधानी असलेल्या रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा आणि राजीनाम्याच्या तयारीत असलेले नाराज मुनीयप्पा, हे सारे डीकेशींना अडचणीत आणणारे असून यामागे काहीतरी शिजत तर नाही ना ? अशी शंका राजकीय  अभ्यासकांतून व्यक्त होत असतानाच ' आता कुठे सिद्धरामय्यांचा खेळ सुरू  झालाय ' असे वक्तव्य करीत आमदार अरविंद बेल्लद यांनी शंकेला आणखीनच धार दिली आहे. 

रामलिंगा रेड्डी  आणि मुनीयप्पा यांचा बोलवता धनी सिद्धरामय्यांच असल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.

राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांनी उपरोक्त वक्तव्य करतानाच,  मुख्यमंत्रीपदाचा बदल झाल्यानंतर सरकार सुरळीत चालणार नाही, असे आपण आधीच सांगितले होते, असा दावा  केला आहे.
धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना अरविंद बेल्लद म्हणाले, "सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर सरकार स्थिर राहणार नाही, असे मी पूर्वीच म्हटले होते. आता मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धरामय्या स्वतः पुढे न येता इतरांना पुढे करून राजकीय खेळी खेळत आहेत."
ते पुढे म्हणाले, "सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांनी खेळ केला होता. आता डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्याने ते समाधानी नाहीत. त्यामुळे ते पडद्यामागून राजकीय डावपेच रचत आहेत."
राज्याच्या विकासापेक्षा सत्तासंघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत बेल्लद म्हणाले, "यापैकी कोणालाही राज्याच्या प्रश्नांची काळजी नाही. जून महिना सुरू झाला असूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मंत्री आपल्या पसंतीची खाती आणि अधिकारी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत."
मध्यावधी निवडणुकांची शक्यता कमी असल्याचे सांगताना त्यांनी, "हे सरकार टिकेल, पण त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष सुरूच राहील," असे मत व्यक्त केले.
मंत्री प्रियांक खर्गे यांच्याबाबत बोलताना बेल्लद म्हणाले, "प्रियांक खर्गे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात भूमिका घेत आहेत. आता त्यांच्याकडे गृह खाते आहे, जे अत्यंत जबाबदारीचे खाते आहे. त्यांनी ते योग्य पद्धतीने सांभाळावे."
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी चांगले कार्य करत असल्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. केवळ इतरांच्या बोलण्यावरून किंवा पूर्वग्रहातून संघाकडे पाहू नये," असेही त्यांनी म्हटले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल