LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मराठी भाषिकांनी मुख्य प्रवाहात यावे : सतीश जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगाव : 30 वर्षांपूर्वीच सीमाप्रश्न सुटलेला आहे. आता मराठी भाषिक लोकांनी मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन करीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मराठी भाषिकांच्या भावनांवर मीठ चोळले आहे.


महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करून अथवा समितीवर बंदी आणून सीमावादाची समस्या सुटणार नाही. समितीवर बंदी आणली की आणखीन वेगळ्या नावाने ते चळवळीत सक्रिय होण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य करताना 30 वर्षांपूर्वीच सीमाप्रश्न संपलेला आहे. आता केवळ शासनाने योजनाबद्धरित्या वाटचाल करून यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.ते इतक्यावरच थांबले नाहीत तर मराठी लोकांनी मुख्य प्रवाहात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.



आजच्या कर्नाटक बंद च्या हाकेबद्दल बोलताना त्यांनी,
प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. तथापि, सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दखल घेत निषेध केला तर बरे . महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालल्याने वाद सुटणार नाही. जर समितीवर बंदी घातली गेली तर ते पुन्हा वेगळ्या नावाने सक्रिय होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारनेच कार्यक्रमाचे नियोजन आणि नियमन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे म्हटले.
सीमेवर महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांसंदर्भात बोलताना जारकीहोळी म्हणाले , त्या योजना येथील मराठी भाषिकांच्या हिताच्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने योजना जाहीर केल्या असतील, पण त्यांचा लाभ सर्वांनाच मिळत नाही. राज्य सरकारच्या योजना सर्व भाषिकांपर्यंत पोहोचत आहेत, असे ते म्हणाले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम