LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हिडकल जलाशय पडत चाललंय कोरडं ...! केवळ 8 टीएमसी इतकंच पाणी राहिलंय शिल्लक ..!

news_1779784377_0_725.webp

 

चिक्कोडी :  बेळगाव आणि बागलकोट अशा दोन जिल्ह्यांचे  जीवनदायी स्रोत म्हणून ओळखले जाणारे हिडकल जलाशय (राजा लखमगौडा जलाशय) कोरडे पडत चालले असून पावसाळ्याला अजून काही दिवस बाकी असतानाच जलाशयाची पाणी पातळी खालावत चालल्याने दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे.

एकूण 51 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सध्या केवळ 8 टीएमसी इतकंच पाणी उरलं आहे. अलीकडच्या वर्षांत उन्हाळा संपण्यापूर्वीच जलाशय इतक्या मोठ्या प्रमाणात आटल्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.

हा जलाशय केवळ शेतीसाठीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचाही मुख्य स्रोत आहे. बेळगाव महानगर , हुक्केरी आणि संकेश्वर शहरांसह 100 हून अधिक गावांना याच जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यांतील अनेक दुष्काळग्रस्त भागांना सिंचन योजनांद्वारे या धरणातून पाणी दिले जात होते. मात्र सध्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे या योजनांवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिसरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर जलाशयातील उरलेलं पाणीही आटून जलाशय ‘डेड स्टोरेज’ स्तरावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन , “उरलेलं पाणी शेती किंवा इतर वापरासाठी सोडू नये. भविष्यात माणसं व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ते केवळ पिण्याच्या वापरासाठी राखून ठेवावं,” अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून प्रशासनाकडे केली गेली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम