LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे !  : बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

निपाणी :  शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून उभा आहे. 

यंदा 25 मे पासून रोहिणी नक्षत्रला सुरुवात झाली आहे . त्या पार्श्वभूमीवर निपाणी भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. सध्या राजधानीतील राजकारणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी सह कार्यकर्त्यांचे लक्ष राजकीय घडामोडी कडे लागले आहे. तर बियाण्यांचा पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पावसासाठी आभाळाकडे लागले आहे. 
 शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून बियाणे, खते आणि औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. उन्हाचा तडाखा कायम असतानाच रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रोहिणी नक्षत्रा पाऊस पडला तर खरीप हंगाम चांगला जातो, अशी शेतक-यांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. नांगरणी स-या सोडणीच्या कामासह  शेणखत टाकून झाले आहे. आता फक्त पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, मूग, उडीद पिकाची पेरणी करणे सोपे होणार आहे. 
दुसरीकडे राजधानी बेंगलोर येथे मुख्यमंत्री निवडण्याचे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री बदलानंतर अनेक खात्याच्या मंत्रिमंडळातही बदल होण्याच्या शक्यतेवर शहरासह ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून दुसरीकडे सर्वत्र राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बालवीर विद्यानिकेतनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतकरंबळ ग्रामपंचायत पिडीओंच्या निलंबनाची होतेय मागणी ..!शिंदोगी फाट्यावर शेतकऱ्यांचा अहोरात्र एल्गार : आमदार वैद्य म्हणाले, ' सायफन दुरुस्ती लवकरच पूर्ण केली जाईल 'मुदतीत विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण करा : आयुक्त कार्तिक एम यांची सूचनाजीआरबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी : आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदनटिळकवाडी पोलिसांनी घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात बेळगावच्या स्केटिंगपटूंनी दिला ' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेशराज्य सरकारने केला विद्यार्थ्यांना गणवेशात बदल : यंदा मिळणार सुतिमिश्रित कापड स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंदिरात करण्यात आली प्रार्थनानियोजनशून्य नगरपालिका : जलवाहिन्यांना गळत्या:  लोकांची पाण्यासाठी होतेय वणवण