LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अस्वलाच्या हल्ल्यात  शेतकरी गंभीर जखमी

बेळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. 

खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील हुलंद गावालगतच्या जंगल परिसरात ही घटना घडली आहे. महेश गावडे (वय 25,  रा. हुलंद ) असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे नेहमीप्रमाणे आपली गाय चारण्यासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेला होता. दिवसभर जनावरे चारून तो संध्याकाळी घरी परतत असताना झुडपांमधून अचानक बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.
जीव वाचवण्यासाठी महेश यांनी जवळच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पायाचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात महेश याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून त्याला तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आपत्कालीन उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहकुटुंब घेतले यल्लम्मा देवीचे दर्शन सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर ....!!शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसादआईसोबत खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूफार्मसी विद्यार्थ्यांचे परिक्षेत सुयश : ऐश्वर्या हवले यांनी दिली आहे माहिती पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यूमंत्री जारकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा दौरा चुलते, आमदार परिषदेचे सदस्य लखन जारकीहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळींकडून शुभेच्छाबेळगावात  एकाच वेळी केले 1,000 केले विश्वगुरू बसवण्णांच्या 34 वचनांचे गायन' त्या ' थरारनाट्य प्रकरणात चौघांना अटक