LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तळेवाडी गावातील 27 कुटुंबांचे वन भागातून स्थलांतर : सरकारकडून दिली गेली प्रत्येकी 10 लाखांची मदत

खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील तळेवाडी गावातील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलातून बाहेर येत मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला असून स्थलांतरित झालेल्या या कुटुंबांना मदत म्हणून कर्नाटकचे वन, पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांच्या हस्ते प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.


जंगलात मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास निसर्गाला वाढीसाठी पोषकता उपलब्ध होईल. आजही अनेक कुटुंबे मूलभूत सुविधा नसलेल्या जंगलात राहतात. ही कुटुंबे मुख्य प्रवाहात आणणे ही आपली जबाबदारी आहे. भिमगड वनक्षेत्रात एकूण 13 गावे असून, सुमारे 750 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. यामध्ये तळेवाडीची 27 कुटुंबे सर्वप्रथम स्वेच्छेने स्थलांतरित झाली आहेत, अशी माहिती मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली आहे.


या पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले असून, उर्वरित 5 लाख रुपयांची रक्कम पूर्ण स्थलांतर प्रक्रियेनंतर शासन नियमानुसार देण्यात येणार आहे, असेही मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी स्पष्ट केले आहे.


गेल्या वीस वर्षांपासून या भागात पुनर्वसनाची मागणी प्रलंबित होती. भिमगडमध्ये नागरहोळ व बंदीपूर प्रमाणे इको-टूरिझमला चालना देत जैवविविधता जपली पाहिजे, असे यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.


खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याला ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले.
धनादेश वितरण प्रसंगी सुभाष माळकडे ( मुख्य वन्यजीव रक्षक) , राधा देवी ( CAMPA मुख्य कार्यकारी अधिकारी), मोहम्मद रोशन ( बेळगाव जिल्हाधिकारी), डॉ. भीमशंकर गुळेद (पोलीस अधीक्षक), मंजुनाथ चौहान( मुख्य वनसंरक्षक), मारिया क्रिस्तराज (उपवनसंरक्षक) उपस्थित होते.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम